जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी अभियानात सर्वोत्तम योगदानासाठी सज्ज – याशनी नागराजन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावोगावी स्पर्धेची जय्यत तयारी विजय जाधव सातारा प्रतिनिधी ग्रामविकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्ह्यात गावोगावी स्पर्धात्मक तयारी सुरू झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेले हे अभियान लोकसहभागातून गावागावात विकासाची नवी उभारी निर्माण करत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद सातारा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती सज्ज झाल्या असून, “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सर्वोत्तम योगदान देऊन जिल्हा राज्यात अग्रेसर ठरवावा” असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत केले. ग्रामपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत नियोजन या बैठकीत नागराजन यांनी स्पष्ट केले की, अभियानातील आठ प्रमुख घटक विषयांवर आधारित १०० गुणांच्या स्पर्धेत गावोगावी काटेकोर तयारी सुरू झाली आहे. या घटक...