Skip to main content

गेल्या ४८ तासांत पोलादपूरमध्ये १६४ मि.मी. पाऊस; परतीच्या सरींनी नद्यांना नवसंजीवनी

📰 गेल्या ४८ तासांत पोलादपूरमध्ये १६४ मि.मी. पाऊस; परतीच्या सरींनी नद्यांना नवसंजीवनी

पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
पोलादपूर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या ४८ तासांत १६४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत पावसाने अक्षरशः अतिवृष्टीचे रौद्र रूप दाखवले. नदीपात्रे, पाणी साठे आणि धरणांमध्ये जलदगतीने पाणी साचल्याने नद्यांना नवसंजीवनी मिळाली.

मुसळधार सरींनी विस्कळीत जनजीवन

रविवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तास जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला, तर वाहतूकही मंदावली. सोमवारी सकाळी मात्र परिस्थिती पूर्वपदावर येऊन रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ दिसू लागली. सोमवारी दिवस-रात्र मिळून फक्त ७ मि.मी. पावसाची नोंद झाली.

दरडी व झाडे पडण्याच्या घटना

पावसामुळे डोंगरी भागांत दरडी व झाडे पडण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. कापडे खुर्दजवळ मातीचा ओसरा आला, तर कुडपण गावात विजेचा पोल कोसळून अडथळा निर्माण झाला. दरडींचे संकट आंबेनळी घाट, जुना कशेडी घाट, कशेडी बंगला मार्ग, कशेडी बोगदा व पलचिल मार्गावर कायम राहिले आहे. गतवर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने आंबेनळी घाट जवळपास एक महिना बंद ठेवावा लागला होता. यंदाही पावसाळ्यात लहानमोठी झाडे व दरडी पडण्याच्या घटना सुरू आहेत.

पावसाची आकडेवारी

तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर, कुडपण, दाभिळ, चिरेखिड, कीनेश्वर, तुर्भे, भोगाव, दिविल, देवळे, ढवळे आदी गावांत परतीच्या सरींमुळे दमछाक झाली. डोंगरी व घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त झाले आहे.

  • २०२३ मध्ये तालुक्यात ४,१०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
  • २०२४ मध्ये पावसाचे एकूण प्रमाण ४,३१९ मि.मी. पर्यंत पोहोचले.
    • जून : ६१६ मि.मी.
    • जुलै : २,१९१ मि.मी.
    • ऑगस्ट : ९४२ मि.मी.
    • सप्टेंबर (आजपर्यंत) : ५७० मि.मी.
  • तर यावर्षी आतापर्यंत ४,०७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पुढील दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

पोलादपूर तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३,६८६ मि.मी. इतके आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हे प्रमाण सातत्याने वाढत असून, यंदाही सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आधीच झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हंगाम अखेरीस सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

आपत्तीचे सावट कायम

दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि वाहतूक विस्कळीत होणे या घटना या हंगामातही सुरूच आहेत. विशेषतः घाटमाथा व डोंगरी भागातील गावांमध्ये सततचा पाऊस व दरडीचे संकट पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनानेही आपत्कालीन पथकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...