प्रतिनिधी – प्रकाश कदम, पोलादपूर
मुंबई–गोवा महामार्गावर कशेडी घाटात गुरुवार (दि.११) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या इको कारचा वेगावर ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
🕒 अपघाताची वेळ व ठिकाण
हा अपघात पहाटे अंदाजे ३.१५ वाजताच्या सुमारास भोगाव हद्दीत कशेडी घाटातील पुलावर घडला. इको कार (क्र. MH-14 KS-0231) भरधाव वेगात जात असताना नियंत्रण सुटले व गाडी पुलावरील संरक्षण भिंतीवर जोरदार आदळून पलटी झाली.
👥 मृत्यू व जखमी
या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५, रा. चहोली, ता. हवेली, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींमध्ये –
मोहन गोरोबा चव्हाण (वय ४२)
धनराज प्रभाकर मगर (वय ४२)
विकास शंकर चव्हाण (वय १८)
नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे (वय ३५)
निंगप्पा कंटप्पा पातारे (वय २८, चालक)
हे सर्वजण पुणे विभागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
🏥 उपचार व्यवस्था
गंभीर जखमी झालेल्या तिघांना तातडीने कळंबनी खेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ जखमी झालेल्या दोघांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
👮 पोलिसांची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सर्णेकर, ठाणे अंमलदार सतीश कदम, पो.हा. नितेश कोंढाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पाठविले. तसेच कशेडी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय गीमवणेकर, हेडकॉन्स्टेबल माजलकर, सोडमीस व चाटे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
⚖️ गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात रजिस्टर नं. ५१/२०२५ अंतर्गत भा.दं.वि. कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणे अंमलदार सतीश कदम करत आहेत.
🚧 स्थानिकांची मागणी
Comments
Post a Comment