Skip to main content

जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी अभियानात सर्वोत्तम योगदानासाठी सज्ज – याशनी नागराजन

जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी अभियानात सर्वोत्तम योगदानासाठी सज्ज – याशनी नागराजन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावोगावी स्पर्धेची जय्यत तयारी

विजय जाधव 
 सातारा प्रतिनिधी 

ग्रामविकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्ह्यात गावोगावी स्पर्धात्मक तयारी सुरू झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेले हे अभियान लोकसहभागातून गावागावात विकासाची नवी उभारी निर्माण करत आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद सातारा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती सज्ज झाल्या असून, “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सर्वोत्तम योगदान देऊन जिल्हा राज्यात अग्रेसर ठरवावा” असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत केले.

ग्रामपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत नियोजन

या बैठकीत नागराजन यांनी स्पष्ट केले की, अभियानातील आठ प्रमुख घटक विषयांवर आधारित १०० गुणांच्या स्पर्धेत गावोगावी काटेकोर तयारी सुरू झाली आहे. या घटकांमध्ये –

शिक्षण,

आरोग्य,

पाणी,

उपजीविका,

कृषी,

रोजगार हमी योजना,

ग्रामपंचायत प्रशासन,

स्वच्छता व पाणीपुरवठा,


यांसह उमेद, बांधकाम विभाग व इतर सर्व विभागांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरापासून ते पंचायत समिती आणि जिल्हा पातळीपर्यंत नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्यास जिल्हा निश्चितपणे राज्यात नावाजला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सक्रिय सहभागाची अपेक्षा

सीईओ यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की, “गावाबरोबरच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद या अभियानात अग्रेसर ठरणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. ग्रामपातळीवरील प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान या स्पर्धेत निर्णायक ठरणार आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, प्रत्येक गावाने आपल्या क्षमतेनुसार विकास साधत स्पर्धेत गुण मिळवणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येकाने समर्पित वृत्तीने काम करावे.

बैठकीत व्यापक सहभाग

या ऑनलाईन मार्गदर्शन बैठकीस जिल्ह्यातील विविध स्तरांवरील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये –
आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, केंद्र चालक, ग्रामरोजगार सेवक, बचत गट कार्यकर्त्या आदींचा समावेश होता.

नवा महाराष्ट्र घडविण्याकडे वाटचाल

राज्यातील ६० दिवसांच्या दौऱ्यांद्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे अभियान जनचळवळीचे रूप घेईल यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामपातळीवर लोकसहभाग वाढत असून, प्रशासनाची साथ मिळाल्यास “नवा महाराष्ट्र” घडविण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल, असा विश्वास याशनी नागराजन यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...