Skip to main content

ग्रामस्थांच्या भेटीगाठींमधून प्रचाराला गती; मुंबईतील गावकरीही समीर चव्हाण यांच्या पाठीशी ठाम

ग्रामस्थांच्या भेटीगाठींमधून प्रचाराला गती; मुंबईतील गावकरीही समीर चव्हाण यांच्या पाठीशी ठाम

बिरवाडी प्रतिनिधी –

काळभैरवाच्या आशीर्वादाने आपल्या मातीचा सुगंध श्वासात घेऊन आणि गावाचं दुःख–सुख मनात साठवून काम करणारे गावचेच सुपुत्र समीर मधुकर चव्हाण यांनी कुंभरोशी गणातून पंचायत समितीच्या सदस्यपदासाठीअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा प्रचार वेग घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत समीर चव्हाण थेट संवाद साधत असून, या भेटींमुळे प्रचाराला अधिक बळ मिळालं आहे.

मुंबईतील सुखसोयींचं आयुष्य बाजूला ठेवून आपल्या गावासाठी आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतलेल्या समीर चव्हाण यांच्या भूमिकेचं गावकऱ्यांकडून विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून, विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गावचा खरा कणा असलेल्या तरुणांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत “घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे” असं ठामपणे सांगणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

विकासाचा केवळ आराखडा मांडण्याऐवजी विकासाचं स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्ष कामातून दाखवण्यावर समीर चव्हाण यांचा भर आहे. ग्रामसेवकाच्या भूमिकेतून शब्दांपेक्षा कामाला अधिक महत्त्व देत त्यांनी आजवर अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, त्याचा विश्वास ग्रामस्थांमध्ये अधिक दृढ झाला आहे. गावाच्या पाणीपुरवठा, रस्ते, युवकांसाठी संधी, तसेच मूलभूत सुविधांबाबत त्यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका लोकांना भावत आहे.

विशेष बाब म्हणजे मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या कुंभरोशी परिसरातील गावातील नागरिकांनीही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत समीर चव्हाण यांच्या समर्थनार्थ दंड थोपटले आहेत. गावासाठी झटणाऱ्या आपल्या माणसालाच संधी द्यावी, अशी भावना या गावकऱ्यांकडून व्यक्त होत असून, प्रचारासाठी ते गावात येण्याची तयारी दर्शवत आहेत.

गावाच्या प्रत्येक घरात उज्वल भविष्याचा दिवा पेटावा, तरुणांना संधी मिळाव्यात आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने समीर चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आपल्या मातीच्या लेकरालाच निवडून द्यावं, अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांकडून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन केलं जात आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...