Skip to main content

ऑल इंडिया पँथर सेनेला साताऱ्यात बळकटी; अनिल मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

ऑल इंडिया पँथर सेनेला साताऱ्यात बळकटी; अनिल मोरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती 

✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :

ऑल इंडिया पँथर सेनेच्या सातारा जिल्हा संघटनेत नव्या ताकदीची भर पडली असून अनिल मोरे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यात संघटन बळकटीसाठी हा निर्णय निर्णायक मानला जात आहे.

संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार गावागावात संघटन विस्तार करणे, आंबेडकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे, तसेच भारतीय संविधानाचे संरक्षण व त्याबाबत जनजागृती करणे, ही जबाबदारी नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत लोकशाही मूल्ये, आरक्षण व्यवस्था, संविधान व मूलभूत हक्कांवर होत असलेल्या आघातांविरोधात संघटितपणे संघर्ष करण्याची गरज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या नियुक्तीप्रसंगी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड, जिल्हा महासचिव आशीष मोरे, युवक जिल्हाध्यक्ष ऋषी घाडगे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अनिल मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक चळवळीचा अनुभव आणि संघटनात्मक कामाची जाण लक्षात घेता त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात संघटनेची कार्यक्षमता वाढून समाजहिताच्या लढ्याला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...