Skip to main content

पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने "एकता दौड"चे भव्य आयोजन सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस व आजीवन विभागाचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने "एकता दौड"चे भव्य आयोजन
सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस व आजीवन विभागाचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

✍️प्रकाश कदम 

पोलादपूर प्रतिनिधी :


भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज पोलादपूर शहरात राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रायगड जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली व पोलादपूर पोलीस ठाण्याच्या वतीने “रन फॉर युनिटी” म्हणजेच एकता दौड चे आयोजन करण्यात आले.

या विशेष उपक्रमाचा उद्देश देशातील एकता, अखंडता आणि बंधुतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या एकता दौडला सकाळी प्रारंभ झाला. पोलादपूर शहरातील मुख्य बाजारपेठ, महाबळेश्वर रस्ता आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून दौडचे मार्गक्रमण झाले. विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय ध्वज आणि "एक भारत, श्रेष्ठ भारत" अशी घोषवाक्ये झळकत होती.

या एकता दौडमध्ये सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व आजीवन अध्ययन विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांसह पोलादपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.

दौड संपल्यानंतर उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. “भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षा यासाठी आपण सदैव तत्पर राहू” अशी शपथ घेताना वातावरण देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेले.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पोलादपूरचे तहसीलदार श्री. कपिल घोरपडे तसेच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन यशस्वी व्हावे यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, श्री. मुंडे आणि सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. राम बरकुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे पोलादपूर शहरात ऐक्य, शिस्त आणि देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या झालेल्या या “एकता दौड” मुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागृत झाला असून, हा दिवस सर्व सहभागींसाठी प्रेरणादायी ठरला.

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...