Skip to main content

साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती; मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने बैठक संपन्न

साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती; मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने बैठक संपन्न

✍️ प्रकाश कदम, 
पोलादपूर प्रतिनिधी : 

पोलादपूर, दि. २९ ऑक्टोबर —
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत केवनाळे पुनर्वसन आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी व आपली माती आपली माणसं
संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष  निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष संजय उतेकर चंद्रकांत मोरे,अनिल मालुसरे, अजय सलागरे, तसेच पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत साखर सुतारवाडी व केवनाळे गावाच्या पुनर्वसनासाठी दरडग्रस्थाना प्राधान्याने राहण्यासाठी घरे बांधून द्यावीत या मागणी सह आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा — जसे की पाणीपुरवठा, वीज, रस्ते, शाळा, आरोग्यसेवा व सामुदायिक सुविधा — समावेश असलेला आराखडा  तसेच बाधित ग्रामस्थांना तातडीने घरे उपलब्धता या मागण्या प्राधान्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

खासदार सुनील तटकरे यांनी या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी, जमीन निवड, आणि आराखड्याची अंमलबजावणी यासंदर्भात सविस्तर चर्चा करत नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनात कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. पायाभूत सुविधा ही पुनर्वसनाची गाभा आहेत आणि त्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील.”

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व सुतारवाडी या गावांवर भीषण दरड कोसळून ११ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले होते. त्याच काळात महाड तालुक्यातील तळिये गावात झालेल्या दरड दुर्घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनांनी संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता.

दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी “आपली माती आपली माणसं” या सामाजिक संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संघटनेच्या वतीने केवनाळे आणि साखर सुतारवाडी पुनर्वसनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनं करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या आत्मदहन आंदोलनानंतर शासनाने या विषयावर गांभीर्याने लक्ष देत आता सकारात्मक पावले उचलली आहेत.

संघटनेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष  निलेश कोळसकर,  कार्याध्यक्ष संजय उतेकर,चंद्रकांत मोरे,अनिल मालुसरे,  तसेच पदाधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत या चळवळीला सातत्य लाभले असून, पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राज पार्टे यांनी या संदर्भात सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून केवनाळे व सुतारवाडी गावकरी विस्थापित अवस्थेत आहेत. शासनाने आता त्यांच्या पुनर्वसनाचा ठोस निर्णय घेतला आहे, हे आमच्यासाठी दिलासा देणारे पाऊल आहे. मात्र हा आराखडा प्रत्यक्षात उतरल्याशिवाय आमची लढाई थांबणार नाही.”

सरकारच्या पुढाकारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून साखर सुतारवाडी व केवनाळे गावाचे पुनर्वसन आता प्रत्यक्षात आकार घेत असून, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आणि इतर सुविधांना प्राधान्य देत पुनर्वसनाचे नवे पान लिहिले जाणार आहे.

---

Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...