Skip to main content

विन्हेरे विभागात विकासशेठ गोगावले यांचा राष्ट्रवादीला दणका; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

विन्हेरे विभागात विकासशेठ गोगावले यांचा राष्ट्रवादीला दणका; ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


✍️.  प्रकाश कदम, 

पोलादपूर प्रतिनिधी – 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या असताना, महाड तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. शिवसेना पक्ष पुन्हा एकदा जिद्दीने आणि दमदार रणनीतीसह कामाला लागला असून, विरोधकांच्या छावण्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे. विशेषतः युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य व कोकण सचिव विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज महाड तालुक्यात झंझावात निर्माण करत आहे.

महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांचा धडाका आणि युवा सेनेच्या नेतृत्वात असलेल्या विकासशेठ गोगावले यांचा जनसंपर्काचा दांडगा अनुभव पाहून अनेक कार्यकर्ते आता शिवसेनेच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत. त्याचेच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे विन्हेरे जिल्हा परिषद गणातील राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला जबर धक्का.

काल दिनांक २६ ऑक्टोबर रोजी विकासशेठ गोगावले यांच्या लंबोदर निवासस्थानी झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात विशेषतः करंजाडी-तांबडे कोंड येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद विष्णू तांबडे, संजय भिकू तांबडे, प्रकाश रामा घोळे, विष्णू बारकू तांबडे, दिनेश रघुनाथ तांबडे, विश्वास रामचंद्र किलने, सखाराम नारायण महाडिक, ज्ञानेश्वर शांताराम महाडिक, गोपीनाथ गणपत तांबडे, प्रभाकर विष्णू तांबडे, संतोष महादेव तांबडे, रंजीत रमेश तांबडे, संजय पांडुरंग तांबडे, संदीप गोपाल तांबडे, किसन महादेव धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाचे आणि नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांचे मनापासून कौतुक केले. त्यांचा प्रामाणिक, जनतेशी जोडलेला आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला, असे अनेक नव्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, युवा सेना महाड तालुकाप्रमुख रोहिदास आंबवळे, उपविभाग प्रमुख जालिंदर मोरे, जिल्हा परिषद संपर्कप्रमुख समीर कदम, उपतालुका प्रमुख बाळा सुतार, संपर्कप्रमुख प्रफुल खेडेकर, तसेच विनय बटावले, रमेश खिडेबिडे, संदीप खिडबिडे, सुबोध कासारे, दिलीप गोटल, संजय निकम, नितीन साळुंखे, सरपंच मंगेश चीचघरकर, गणेश पवार, गजानन सुतार, सुशील सुतार यांसारखे अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विन्हेरे विभागात मोठी राजकीय चुरस निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर विकासशेठ गोगावले यांनी या मतदारसंघात आपली संघटनशक्ती दुपटीने वाढवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले हे सलग पक्षप्रवेश पाहता, विन्हेरे विभागातील शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक मजबूत आणि विरोधकांसाठी आव्हानात्मक बनत आहे.

विकासशेठ गोगावले यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा "जनसंपर्काचा झंझावात" आता महाड तालुक्यातील राजकीय समीकरणेच बदलणार, यात कोणतेही संशय नाही.



Comments

Popular posts from this blog

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’

राज्यपालांच्या स्वागतासाठी ‘चिखलाच्या पायघड्या’ ऑर्थर सीट रस्त्याची दुरवस्था; वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त जितेंद्र कारंडे ,  प्रतापगड प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भाषेत, राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या! पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची ...

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वनविभागाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांचा संताप   तापोळा – प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावात आज सकाळी झालेल्या रानगव्याच्या प्रचंड हल्ल्यात राघू जानू कदम (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे परिसरात भीतीचे तसेच वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघू कदम हे दररोजप्रमाणे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारी ते परत न आल्याने काही नागरिकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, त्यांना राघू कदम शेतात मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात रानगव्याने अचानक हल्ला करून जोरदार धडक दिल्याने त्यांच्या छातीत शिंग आरपार गेल्याचे समोर आले आहे. हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तापोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मात्र, या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्य...

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?”

“वनसंपदेवर कुरघोडी; मेटतळे येथे बेकायदेशीर रस्ता, प्रशासनाकडून दुर्लक्ष?” सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटतळे येथील सर्वे क्रमांक ११/१० या मिळकतीमध्ये वनसंपदा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित मिळकतधारकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जंगलातून रस्ता काढल्याचे समोर आले असून, यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती संबंधित गावकामगार तलाठी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी “पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला असून पुढील कारवाई तहसीलदारांच्या स्तरावर होणार आहे,” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचीही तक्रार आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वनक्षेत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप होत असताना प्रशासन निष्क्रिय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलातील झ...